ते वादळ अक्राळ विक्राळ..
समोर उभा ठाकलेला प्रत्यक्ष काळ..
उसळलेला महापुराचा तो भयाण डोह..
आणि त्यात वहाणारे अनेक अचेतन देह..
त्या तांडवातही एक झाड
जमिनीला अगदी घट्ट धरून
त्यालाच विळखा घालून तीही
जीवनाची शेवटची कास पकडून..
घरात दारिद्र्य अठरा विश्व
रोजचं पाहिलं मरण
मनातल्या मनातच कितीदा रचलं
आपणच आपलं सरण..
आज घर पाहिलं वाहताना..
बहुदा आय- बा नि भैणही
दूर दूर पर्यंत आहेच कुठे
वाचवणारी साधी वेलही..
बधीर सा-या संवेदना
मन झाल होतं सुन्न
तरी ही धडपड कशासाठी
तिलाच पडला होता प्रश्न..?
मरणप्रायच होतं जगणं जरी
जगायलाही नव्हते काही कारण
हाताची पकड तरी करून घट्ट..
मरणाचं नाकारलं तिने आमंत्रण..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर
Tuesday, January 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment