खूप दिवसांनी जुन्या मैत्रिणीचा फोन आला. माझा किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस नसतानाही तिचा फोन आला तेव्हा नंबर बघून थोडं आश्चर्यच वाटलं. ‘सहजच असेल ना..? की..?’ अशी शंकेची पालही चुकचुकली. फोन उचलल्यावर तिचा तितक्याच उत्साहातलं नेहमीचं ‘हॅल्लो’ ऐकलं आणि जीव भांडय़ात पडला. ‘काय गं, असं अचानक?’ ‘हो गं, खरंच खूप कंटाळा आलाय. सकाळी उठायचं- डबा, जेवण, मुलं, दप्तरं, शाळा, लोकल, नोकरी- मरेपर्यंत कामाचं प्रेशर, पुन्हा लोकल, धावपळ, घर. पुन्हा स्वयंपाक, घर, नवरा, मुलं, त्यांचा अभ्यास! लाइफ में कुछ ब्रेकही नहीं! भेटूया ना गं
.
.
कधी भेटूया गं?
Friday, October 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
झक्कास! म्हणजे पुरुष म्हणून स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून खुदुखुदु हसलो देखील. पण नंतर विचार केला की बायका ज्या संसारात अडकून पडल्या तो संसार कोणाचा आपलाच ना? मुलांच्या टेस्ट्स सासुबाई हे सगळे कुणाचे? आपलेच. मग त्यात आपण आपल्या बायकांना एवढं गुंतवतो की त्यांना स्वत:साठी थोडासुद्धा वेळ मिळु नये? पुरुष हातातून मासळी सुटावी तसे सुटतात व मौजमजा करुन येतात. स्त्रियांनी केलेल्या कष्टांची कदर असावी व पुरुषाने तेवढ्याच जबाबदारीने कामे करावीत. बायकांनीही संसार एके संसार न करता स्वत:साठी आवर्जून वेळ काढावा.
ReplyDelete