ऊठ ना रे - बघ ना - किती वाजले
त्याच्या कानात, तिचे शब्द कुजबुजले
कूस परतत म्हणाला- थांब ग
अम्मळ थोडं निजू दे
पहाटेच्या ओल्या दवाने
तुझं अंग अंग भिजू दे
ती रुसली-मुसमुसली- म्हणाली
अस्सं रे काय - आज का आळस ?
लगबग झाली चहुदिशां परी
सा-या देवळांचे अंधारलेले कळस
रोज उठतो ना ग वेळेवर
सोमवार शनिवार रविवार सुद्दा !
एकदा आला कंटाळा मला
तर किती ऐकवशील अद्वातद्वा !
ती आली काकुळतीला
म्हणाली, नाही रे - तस्सं नाही,
मला किनई मनापासून
तुला अजिबात त्रास द्यायचा नाही
बघ, रुसलास ना ! …………
अनादि काळ तुझ्यामागे रुंजी घालतेय
आणि तुझ्याभोवताली अथक फिरतेय..
मान्य मला..
तुझ्याशिवाय वेगळाले अस्तित्व नाही
माहीत आहे तुझ्याविना -
माझ्या असण्यालाही महत्व नाही
म्हणूनच म्हणते…हे सूर्यनारायणा,
माझ्यासाठी तरी आता ऊठ ना रे…
अनावर झोपेचा मोह
जरी आवरता आवरेना
पृथ्वीचा लाडिक हट्ट..!
त्याला मोडता मोडवेना
आपल्या सहस्त्रबाहूंनी त्याने
तिला आलिंगन देऊ केले..
आणि दाहिदिशा उजळून निघाल्या..!
: सौ. अनुराधा म्हापणकर
डिसेंबर २१, २००९
(आज सूर्य उशीराच उगवला !)
Monday, December 21, 2009
Monday, December 14, 2009
खरं ना ??
खरं सांगू का
तसं.. फारसं कंटाळवाणं नाही आयुष्य !
तस्स रुटिन.. कामाला जुंपलेलं
तरी विकेन्डला विरंगुळा जपलेलं
एखादं हटके नाटक, सीसीडीतली कॊफ़ी
मल्टिप्लेक्समधे नुकता रीलीज्ड मूव्ही
मॊल, हॊटेलीन्ग, शॊपिन्ग्ज..
वर्षाकाठी गेट टूगेदर्स, गॆदरिन्ग्ज
झालीच तर एखादी प्लॆन्ड सहल
अगदीच नाहीतर निदान वर्षासहल
लग्न.. मुंज.. सण समारंभ
नव्या प्रोजेक्टचा झोकात आरंभ
चाललंय तस्स उत्तमच !
कुठे काही उणं धुणं.. नाहीच !
पण तरी कोणजाणॆ का … काही खुपतच !
कुठेतरी आतल्याआत.. काहीतरी दुखतच !
कदाचित सोशल खूप झालोय..!
बाहेरच्या गर्दीत मिसळून गेलोय ..!
आणि…
जीवाभावाच्या माणसांशी मात्र..
संवाद हरवून बसलोय़ !
खरं ना ??
सौ.अनुराधा म्हापणकर
तसं.. फारसं कंटाळवाणं नाही आयुष्य !
तस्स रुटिन.. कामाला जुंपलेलं
तरी विकेन्डला विरंगुळा जपलेलं
एखादं हटके नाटक, सीसीडीतली कॊफ़ी
मल्टिप्लेक्समधे नुकता रीलीज्ड मूव्ही
मॊल, हॊटेलीन्ग, शॊपिन्ग्ज..
वर्षाकाठी गेट टूगेदर्स, गॆदरिन्ग्ज
झालीच तर एखादी प्लॆन्ड सहल
अगदीच नाहीतर निदान वर्षासहल
लग्न.. मुंज.. सण समारंभ
नव्या प्रोजेक्टचा झोकात आरंभ
चाललंय तस्स उत्तमच !
कुठे काही उणं धुणं.. नाहीच !
पण तरी कोणजाणॆ का … काही खुपतच !
कुठेतरी आतल्याआत.. काहीतरी दुखतच !
कदाचित सोशल खूप झालोय..!
बाहेरच्या गर्दीत मिसळून गेलोय ..!
आणि…
जीवाभावाच्या माणसांशी मात्र..
संवाद हरवून बसलोय़ !
खरं ना ??
सौ.अनुराधा म्हापणकर
Subscribe to:
Posts (Atom)