एक उसासा फक्त
बरंच काही बोलून गेला
किती हळव्या भावनांना
एका श्वासावर तोलून गेला
.
आता शब्दांना काही
बोलणे स्फुरलेच नाही
तरी ते बोलिले बापुडे
अर्थ त्यात उरलेच नाही
.
विरला तो उसासा हवेत
उगा श्वासात बोटे खुपसू नका
पसरले शब्द - भास खोटे
उगा भाव त्यातूनी उपसू नका
.
सारे आता शांत संथ
श्वासांनाही साधलेली लय आहे
शब्द आणि श्वास… !
त्यांची रोजचीच ही सवय आहे
.
अनुराधा म्हापणकर
खूप सुंदर लिहिल्यात भावना तुम्ही.... अगदी मनाला स्पर्शून जातात.....
ReplyDelete