ती रुबाबदार कमान
आभाळात डौलाने झुकली
सप्त-रंग होते त्यात
पण प्रत्येक रंग
एकमेकांत मिसळलेला
एकही रंग दुसर्यापासून
वेगळा करणं अशक्य
तरी प्रत्येक रंगाने
टिकवून ठेवलं होतं
स्वत:चं वेगळं अस्तित्व
त्या इंद्रधनुकडे
अनिमिष डोळ्यांनी
किती वेळ पहात राहिले
कुठेतरी वाटत राहिलं मग-
.
माझ्या माणसांत विरघळताना
मीही हवी होती का जपायला
माझीही वेगळी ओळख..?
: सौ. अनुराधा म्हापणकर
Friday, March 6, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment