.
आसवांना वाट करून दिली..
मनसोक्त म्हटलं वाहून घ्या एकदाचं..!
मग.. डोळ्यांनीच दटावलं त्यांना..
चिडत म्हटलं.. आता हे वाहाणं शेवटचं..!!
तेव्हापासून घाबरलेत..
डोळ्यांत आता त्यांची गर्दी होत नाही..
मात्र अलिकडे वरचेवर सर्दी होत असते..
कशाने?.. काही कळत नाही
नाकातून सूँ..सूँ.. करत
वहात रहातं पाणी.. अविरत
पोल्युशन हो!.. धुळीची अँलर्जी..!
मी बिनधास्त ठोकून देते..
.
पण कळलय कारण खरं..
अश्रूंनी.. त्यांची..
रोजची पायवाट बदललीय..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर
Saturday, November 1, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment