.
पाण्याचा रंग घेतला
हवेचा संग घेतला
पाणी कसं मिसळतं कोणातही
हवा कशी गंध घेते कोणाचाही..
पण मग सरभेसळ झाली..
माझ्या सात्विक रंगात
भलतीच मिसळ झाली..
माझा दरवळ लपला..
भलताच दर्प आला
उगारलेल्या रंगाने
त्या उग्राट दर्पाने
जागी झाले
भानावर आले
पाण्याबाहेर आले
हवेला दूर केले
माझे अस्तित्व.. मीपण माझे
गंध माझा.. आणि रंग ही माझे
जगते घेऊन आता सारे स्वत:चे..!!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.
Wednesday, November 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment